Posts

मैत्री

साधारणपणे whatsapp वर आलेल्या कविता, गोष्टी, तत्वज्ञान, चुटकुले हे वाचा आणि विसरून जा वर्गातले असतात. क्वचित प्रसंगी काहीतरी चांगले येते. तसे आज हि मैत्री वरची कविता आली. वाचल्या बरोबर भावली मनाला, कोण कवी आहे कोण जाणे.  मैत्री बद्दल वाचून भावुक व्हायचे वय नाही माझे पण कदाचित वय होईल तेंव्हा भावुक होईनही.  आजतरी हि कविता माझ्या त्या सर्व मैत्रिणींना ज्यांच्याशी खूप मैत्री झाली पण काळाच्या ओघात मागे पडली पण पुन्हा कधीतरी अशाच त्या "ठंडी हवा का झोंका" बनून येतील माझ्या आयुष्यात   कभी आ भी जाना बस वैसे ही जैसे परिंदे आते हैं आंगन में या अचानक आ जाता है कोई झोंका ठंडी हवा का जैसे कभी आती है सुगंध पड़ोसी की रसोई से...... आना जैसे बच्चा आ जाता है बगीचे में गेंद लेने या आती है गिलहरी पूरे हक़ से मुंडेर पर.. जब आओ तो दरवाजे पर घंटी मत बजाना पुकारना मुझे नाम लेकर मुझसे समय लेकर भी मत आना हाँ , अपना समय साथ लाना फिर दोनों समय को जोड़ बनाएंगे एक झूला अतीत और भविष्य के बीच उस झूले पर जब बतियाएंगे तो शब्द वैसे ही उतरेंगे...

बागकाम एक आनंद

 कुठल्याही छंदात रमून जाणे, तहान भूक हरपून जाणे, कशाचे वेड लागणे वगैरे गोष्टी माझ्या बाबतीत कधी झाल्याचं नाहीत, खूप इच्छा असूनही. पूर्ण केलेल्या छंदांपेक्षा अर्धवट सोडलेले छंद अमाप आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मी एका निष्कर्षाला आले होते कि आपल्याला काही छंद लागणे शक्य नाही किंवा ४ जणांना आहे म्हणून आपल्याला असायलाच हवा असं  हि काही नाही. माझ्या लहानपणी आमची खूप छान  फुलबाग होती. मोगरा, सायली, गुलाब, शेवंती, झेंडू अशी अनेक फुलझाडे होती. आमचे घर तर फुलांसाठीच ओळखल्या जायचे. बाबा खूप प्रेमानी जोपासायचे आणि मी मात्र सुंदर आलेली फुले तोडून शाळेत बाईंना किंवा आवडत्या मैत्रिणींना देऊन भाव खात असे. पुढे नागपूर सोडून पुण्याला आलो तिथेही गच्चीवर गांडूळखत वापरून बाबानी सुंदर बाग  फुलवली होती आणि लोकं दुरून दुरून पाहायला येत होते. इथे पण माझा सहभाग फोटो काढणे आणि भाव खाणे इतकाच होता.  पुढे ते घर सोडून फ्लॅट मध्ये आलो आणि अगदी छोटी गच्ची वाट्याला आली. अनेक दिवस काहीच फुलझाडे नव्हती. कधी आणली तर ती कबुतरांनी खराब केली. मग आम्ही बर्ड नेट लावून घेतली आ...

सकाळची शोभा

Image
आज टेकडीवर फिरायला गेले तेंव्हा टेकडी नेहमीप्रमाणे हिरवीगार होतीच पण पहाटेच्या सूर्याचे इतके मनोहारी दर्शन झाले कि ते वर्णन करू शकीन इतकी प्रतिभा माझ्या जवळ नाही. फोटो मधून जे  दिसते आहे त्या पेक्षा खूप विलक्षण दृश्य होते. घरी आल्यावर ताई ला फोटो दाखवला तेंव्हा ताई आपसूक हि कविता म्हणू लागली. आता भा. रा. तांबे च्या प्रतिभेने अचंबित होऊ कि प्रत्यक्ष दृश्याने इतकाच काय तो प्रश्न ... मूळ कवितेचे शीर्षक सायंकाळची शोभा असे आहे पण त्यातले बरेचसे वर्णन जसेच्या तसे लागू पडते सकाळच्या शोभेला पण.   पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे  झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे ईंद्रघनुष्याचे अशी अचल फुलपाखरे, फुले साळिस जणू झुलती साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती. झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती! हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती! पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा. कुठे बु...

नील बट्टे सन्नाटा

आज खूप दिवसांनी एक खूप छान सिनेमा पहिला. आई मुलीच्या गोड नात्यावर आधारित. खरंतर तो प्रचारकी थाटाचा होऊ शकला असता पण तो अगदी शेवटचा थोडासा भाग आहे. खुसखुशीत संवाद, पात्रांचा सुंदर अभिनय आणि आपल्याला कधी ना कधी आलेले तसे अनुभव. एक मरमर काम करणारी  मोलकरीण(बाई ) आणि तिच्या उडाणटप्पू  लेकीची  कथा. पण उगीच गरिबी, अन्याय, पैशामुळे नाकारले जाणे वगैरे मेलोड्रामा औषधाला पण नाही.  आई चंदा आणि तिची मुलगी अपेक्षा उर्फ अप्पू ह्यांची हि कथा. अप्पू चे स्पष्ट (!) विचार .. इंजिनियर ची मुलं इंजिनिअर, डॉक्टर ची मुलं डॉक्टर तशी कामवाल्या बाई ची मुलगी कामवाली बाई. ती काय शिकून इंजिनिअर आणि डॉक्टर थोडीच होणार. अभ्यास करून करायचे काय .. आणि त्यातून ते गणित .. त्यात तर नील बट्टे सन्नाटा म्हणजे टोटल अंधार .. ओ म्हणता ठो कळत नाही. शाळेत जावे, मित्र मैत्रिणीन बरोबर दंगा मस्ती करावी आणि घरी परत यावे असे 'साधे' विचार.  पण आई ला कुठे असं वाटतंय. तिची मुलीला खूप शिकवायची इच्छा. शाळेतल्या मास्तरांनी पण सगळी अशा सोडलेली. शेवटी आईच शाळेत विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेते आणि मुलीशी पैज लाव...

अतर्क्य ना घडले काही ...

 गेल्या ३-४ महिन्यात २ घटना अशा घडल्या ज्यामुळे असे वाटते कि माणसाला आपण आणि आपले प्रियजन अमरपट्टा घेऊन जन्माला आले  आहे असे वाटते का ! एका घटनेत शाळकरी सोबती आपल्या पत्नी सह मध्यरात्री स्वतः गाडी चालवत येत होता आणि झोप जी काळा प्रमाणे कधी घाला घालेल सांगता येत नाही तशी ती आली आणि भीषण अपघात होऊन तो वाचला पण पत्नी जागीच गेली.  दुसऱ्या एका घटनेत एक लहानगी वरच्या मजल्यावरून पडून गेली. घराच्या मोठ्यांचे थोडेसे  दुर्लक्ष ह्याला कारणीभूत ठरले. दोन्ही वेळा  प्रचंड  हळहळ व्यक्त झाली आणि जे लोक अप्रत्यक्ष जबाबदार होते त्यांना आयुष्यभराचे 'survivor guilt'  लागून राहिले. कळत नकळत म्हणायचे कि कळतंच आपण सगळे जण अशा चुका करतो.  बरेचदा काहीच होत नाही म्हणून सुरक्षेचे नियम धुडकावून लावतो. काहीवेळा आपल्याला चाहूल लागते सुद्धा कि काही विपरीत घडेल पण सुदैवानी तसे होत नाही आणि आपण पुन्हा बेफिकिरीने वागू लागतो . नियम पाळायच्या बाबतीत आपण भारतीय जरा जास्तीच बेपर्वा आहोत असे जाणवते इतर देशात जाऊन आल्यावर. मी स्वतः पण त्याला अपवाद नाही. कॉलेज मधली घटना ...

बुडापेस्ट - हम दिल दे चुके सनम

मध्ये एकदा चॅनेल सर्फिंग चा रिकामटेकडा उद्योग करताना 'हम दिल दे चुके सनम' लागला   होता आणि त्यातला   शेवटचा फार भावुक प्रसंग चालू होता ज्यात ऐश्वर्या अजय देवगण कडे परत जाते.   पण  माझे लक्ष मात्र दर वेळी हा प्रसंग पाहताना मागच्या रोषणाई केलेल्या ब्रिज कडे जाते. कारण जरी सिनेमात ते दृश्य इटली मधले  आहे असे सांगितले आहे  तरी त्या सर्व सिनेमाचे शूटिंग मात्र बुडापेस्ट ला झाले आहे. बुडापेस्ट ला गेल्या गेल्या आमच्या कंट्री मॅनेजर ने दिलेली हि पहिली माहिती जी आजवर माझ्या लक्षात आहे ! काही माणसं किंवा जागा ह्यांच्याशी आपला अगदी अल्पकाळ संबंध आला असला तरी कायम आपल्या मनात जागा धरून असतात. बुडापेस्ट हा असाच माझ्या  reminiscences चा भाग आहे. ज्याचा डिक्शनरी मधला अर्थ 'भूतकाळाच्या रम्य आठवणी' आहे.  भूगोलाबाबतच्या अज्ञानामुळे जायला निघाले तेंव्हा हंगेरी हा देश नक्की आहे तरी कुठे हे पाहण्या पासून तयारी. पूर्व युरोपात आहे इतकीच माहिती. आणि आपल्या कडून तिथे जायला फ्रॅन्कफुर्ट मार्गे जावे लागते असे कळले. तिथली भाषा माग्यार आणि चलनाचे नाव forint  हि ...

आमच्यावेळी ना ...

 गेल्या महिन्यात झालेल्या reunion मध्ये जवळपास ३० वर्षांनी शाळकरी सोबती भेटले.आणि मग आठवणींचे धबधबे वाहू लागले.  एक जण सांगत होता कि BE झाल्यावर ह्या मित्रांनी गोव्याला जायचे ठरवले होते आणि कुठल्यातरी तारखेला मिरज स्टेशन वर १० जण जमणार होते आणि चक्क १० जण १० ठिकाणहून येऊन भेटले आणि एकदम मस्त गोवा ट्रिप झाली ज्याची आठवण आजही ताजी  तवानी आहे. फोन फारसे कुणाकडे नव्हते पण तरी निरोप पोचले आणि ठरल्याप्रमाणे सर्व झाले. आणि मग गाडी नेहमीप्रमाणे आपल्या वेळी कसं होते  आणि आत्ताच्या मुलांना कित्ती काही काही लौकर मिळाले ह्यावर घसरली. तेंव्हा  पत्रं पाठवली कि उत्तर यायला २-३ आठवडे लागत . आवडती गाणी ऐकायला दिवस दिवस रेडिओ ऐकत असू. सिनेमा मॉर्निंग , मॅटीनी, इव्हनिंग अशात होता. रेल्वे तिकिटासाठी तास तास रांगेत उभे राहत असू. TV  वर एकमेव दूरदर्शन चॅनेल . एक ना दोन असंख्य गोष्टी ज्यात काल आणि आज मध्ये भयंकर तफावत आहे. अशी तफावत लक्षात येऊ लागली हि बहुदा वय वाढू लागल्याची खुण आहे ज्यामुळे मन मागे मागे जायला बघते आणि जुनेच कसे सोने होते असं  वाटू लागते...