ऋणानुबंधाच्या ...
एखादे ठिकाण आपल्याला का आवडत असावे असा विचार करत होते. तिथल्या सृष्टी सौंदर्य मुळे, त्याच्या नाम महात्म्यामुळे कि आपल्या तिथल्या वास्तव्याच्या सुखद आठवणींमुळे. सगळी कारणे बरोबर असावीत पण कालपरत्वे सृष्टी सौंदर्य फारसे लक्षात राहत नाही पण तिथे भेटलेली माणसं मात्र कायम स्मरणात राहतात. काहींशी तुमचे त्यांच्याशी पूर्वजन्मीचे नाते असावे असे बंध जुळतात. पहिला परदेश प्रवासाचा अनुभव हा बराचसा 'दुरून डोंगर साजरे'सदरात मोडतो. जाताना जेवढा उत्साह असतो तो तिथे प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांनी पार नाहीसा होतो. माझं काहीसे तसेच होता होता राहिले त्याचे कारण अभ्यंकर काका. लंडन मधील पहिला आठवडा भयंकर गेला होता. खाण्याची प्रचंड आबाळ, नवीन वातावरण, राहायची नीट सोय नाही. एक वेळ तर सगळा गाशा गुंडाळून परत जावे ह्या विचाराप्रत आले होते आणि तेंव्हा कोणीतरी अभ्यंकर काकांचा पत्ता दिला की ते पेइंग गेस्ट ठेवतात म्हणून. मी त्यांना फोन केल्यावर ते म्हणाले जरूर राहायला ये, आम्ही वाट पाहतो आहे. सगळं सामान आवरुन त्यांच्या कडे पोचायला मला त्या दिवशी र...